महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राज्यातील १ हजार १६५ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होणार आहे. राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६५ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी आज मतदान होणार आहे.सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. तर सायंकाळी पाच पाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. सर्व ठिकाणी मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे.विदर्भातील आठ जिल्ह्यांतील १६० ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांसह सदस्यांच्या निवडीसाठी आज मतदान होत आहे. विदर्भातील १६९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या होत्या.
त्यापैकी चार जिल्ह्यांतील ९ ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध झाली. उर्वरित ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे.सर्वाधिक ९४ ग्रामपंचायतीची चंद्रपूर जिल्ह्यातील आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील ७ तालुक्यांतील ९४ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे.यामध्ये भद्रावती, चिमूर, मुल, जिवती, कोरपना, राजुरा व ब्रह्मपुरी तालुक्यातील ग्रापंचायतींचा समावेश आहे. स्थानिक स्तरावर राजकीय प्रचारसभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.भंडारा जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे.यामध्ये भंडारा तालुक्यातील खराडी, परसोडी, राजेदहेगाव, खैरी पांदी, संगम पुन,पिपरी पुन ,भोजापूर,केसलवाडा, खमाटा, सालेबर्डी,सिरसघाट पुन.,टेकेपार पुन ,तिड्डी, बोरगाव बु. पुन,इटगाव पुन,सुरेवाडा पुन,तुमसर तालुक्यातील डोंगरी बुज,पवनी तालुक्यातील गोसे बुज,साकोली तालुक्यातील सिरेगावटोला या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या १६ ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान होणार आहे. सरपंचपदाच्या थेट निवडणुकीसह तब्बल ९९ ग्रामपंचायत सदस्यपदासाठी निवडणूक होणार आहे. जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील दोन, अहेरी दोन, धानोरा तालुक्यातील तीन, भामरागड चार, देसाईगंज दोन, आरमोरी दोन, एटापल्ली एक आणि गडचिरोली तालुक्यातील एका ग्रामपंचायतींचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक , भिवापूर आणि कुही तालुक्यांतील १५ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. वर्धा जिल्ह्यातील ९ ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. यात वर्धा तालुक्यातील सालोड (हिरापूर) व बोरगाव (नांदोरा), आर्वी तालुक्यातील अहिरवाडा, सर्कसपूर, पिंपरी, मिर्झापूर, मांडला, जाम , हैबतपूर या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
गोंदिया जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायती, अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील सोमठाणा खु. (मोथाखेडा) आणि वाशीम जिल्ह्यातील केकतउमरा येथे मतदान होणार आहेत.गडचिरोली जिल्हा माओवाद प्रभावीत असल्याने सकाळी ७ ते दुपारी ३ अशी मतदानाची वेळ असून तालुका मुख्यालयातून मतदान पथके शनिवारी रवाना करण्यात आली आहेत. मतदान सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलिस तसेच प्रशासकीय यंत्रणेने जय्यत तयारी केली आहे. तब्बल दोन हजार पोलिस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. भामरागड, एटापली आणि धानोरा या तालुक्यातील मतदान पथके काही ठिकाणी थेट हेलिकॉप्टरने रवाना करण्यात आली. तर काही ठिकाणी पथकांचा तब्बल पाच ते पंधरा किलोमीटर पायी प्रवास झाला आहे. मतमोजणी १८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.