मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात सत्तांतराचं सुरू झालेलं वादळ काही केल्या शांत होताना दिसत नाहीये. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुकच्या माध्यामातून संवाद साधाला.त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनी वर्षा बंगल्यावर दाखल होत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता गेल्या दोन दिवसांपासून बंडखोर म्हणून चर्चेत आलेल्या एकनाथ शिंदेनी अगदी सूचक ट्वीट केले आहे.शिंदे यांचे हे दिवसभारातील तिसरं वीट असून, यामध्ये त्यांनी चार मुद्द्यांमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत.
एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेल्या एकनाथ शिंदेनी ट्विट मध्ये असे महंटले आहे की,गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला..घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. त्याशिवाय पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या हितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे असल्याच्या थेट मत व्यक्त केले आहे.