महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
दरोड्याचा गुन्हा ४८ तासात उघडकीस आणून पाच दरोडेखोरांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या
पथकाला यश आले आहे.सचिन रावसाहेब पवार,(वय.२५) सोमनाथ गोपीनाथ गायकवाड, (वय.२३) दोघेही रा.सदाफुले वस्ती,ता.जामखेड,जि.अ.नगर गोविंद वासुदेव घुमरे,वय २४ (रा. पारगाव शिरस,ता.जि.बीड ) शिवाजी महादेव अडागळे,वय ३३ वर्ष सध्या,(रा.वनवासवाडी, सातारा) दशरथ भुजंग क्षीरसागर वय.३२ (रा.प्रतापसिंहनगर, सातारा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास शेंद्रे गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर पुलाच्याखाली तीन वेगवेगळ्या दुचाकीवरून आलेल्या अनोळखी इसमांनी विनायक विजय हाके,वय.३० वर्ष (रा.बोरगाव,ता.वाळवा ) याची पिकअप व्हॅन थांबवून तू सोनगाव रोडला पिकाला धडक देऊन आला आहेस.असे सांगत त्याच्या डोळ्यात चटणी टाकून खिशातील मोबाइल काढून घेतला.अन्य अनोळखी इसमांनी पिकअप व्हॅनच्या ड्रायव्हरमध्ये ठेवलेले ५२ हजार ६८० रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार धुमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले होते.पथकाने घटनास्थळी पाहणी करून या गुन्ह्यातील फिर्यादी तसेच त्याच्यासोबत हजर असलेला गाडीवरील क्लिनर,इतर साक्षीदार यांच्याकडे विचारपूस केली असता पथकाला एक महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त झाली.त्या अनुषंगाने सातारा शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून गोपनीय बातमीदारांना मार्फत खातरजमा केली असता हा गुन्हा सातारा शहरातील एका संशयिताने त्याच्या जामखेड,बीड जि.अहमदनगर येथील साथीदारांसह केला असून संबंधित संशयित त्याच्या मूळ गावी भुम,जि.उस्मानाबाद येथे असल्याची माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भुम व बीड येथे जाऊन वरील पाच जणांना ताब्यातघेऊन विचारपूस केली.त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई सातारा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश गर्जे,पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ,मदन फाळके,पोलीस अंमलदार उत्तम दबडे,तानाजी माने,कांतीलाल नवघणे,विश्वनाथ संकपाळ,
अतिश घाडगे,संतोष पवार,संतोष सपकाळ,संजय शिर्के,विजय कांबळे यांनी केलेली आहे.