Big Breaking : आंबी खुर्द मध्ये कऱ्हा नदीवर वाळू तस्करांचा कब्जा ; महसूल प्रशासन नाममात्र कारवाई करून धन्यता मानणार का ? आंबी खुर्दमधील वाळू तस्करी राजकारणाशी संबंधित असल्याची जोरदार चर्चा ??


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुक्यातील कऱ्हा नदीपात्रात असणाऱ्या बेसुमार वाळूचा लिलाव पर्यावरण विभागाने मंजुरी न दिल्याने झाले नाही.मात्र,यानंतरही कऱ्हा नदीपात्रातुन आंबी खुर्द परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या सर्रासपणे वाळूची तस्करी सुरू आहे.आंबी खुर्द मधील स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार,सध्या एक ट्रॅक्टर वाळूचा दर ५ ते ७ हजार रुपये सुरू आहे.आंबी खुर्द परिसरातील कऱ्हा नदीपात्रात असणाऱ्या वाळू साठ्यांचे लिलाव झालेले, नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाळू वाहतूक सुरू आहे.त्यामुळे ही वाळू कुठून येत आहे. हे मात्र समजण्यापलीकडे आहे.असे असताना तालुक्यातील आंबी खुर्द मधून वाळूची तस्करी जाेमात सुरू असून,यामुळे महसूल विभागाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे.

आंबी खुर्द मध्ये सध्या वाळूची तस्करी जोरात असून यातून अनेक तस्कर गब्बर झाले असून,ते “सबकुछ मॅनेज” है ची भाषा करीत आहे.नदी पात्रातून वाळूची अवैध वाहतूक करण्यासाठी रेती तस्करांनीच वेळा देखील ठरविल्या आहेत. महसूल विभागाकडून केवळ बघ्याची भूमिका स्वीकारली असल्याने वाळू तस्करांच्या मुसक्या आवळणार कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.मात्र, महसूल विभागाचे अधिकारी केवळ नाममात्र कारवाई करून मोकळे होण्यातच धन्यता मानत आहे.त्यामुळे वाळू तस्करांना मोकळे रान आहे.वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी कोण पुढाकार घेणार असा सवाल केला जात आहे.आंबी खुर्द मधील वाळू तस्करीत राजकारणाशी संबंधित काही जण वाळू तस्करीत सहभागी असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.त्यामुळे प्रशासनाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे.

तर या सर्व प्रकाराची दखल घेऊन कारवाई करणार कोण ? असा सवाल देखील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.वाळू तस्करी करताना वाहने पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे वरिष्ठ अधिकारीच तो आपला माणूस आहे,कारवाई करू नका असे सांगून कारवाई न करण्याचा सल्ला देतात.त्यामुळे कनिष्ठ अधिकाऱ्यांचा सुद्धा पर्याय नसतो.अशी दबक्या आवाजात चर्चा देखील महसूल विभागाच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून होताना दिसत आहे.मागील दोन-तीन महिन्यांपासून आंबी परिसरात वाळूची तस्करी जोरात सुरू आहे. त्यामुळे रेती तस्कर चांगले मालामाल झाले असून, त्यांच्याकडील वाहनांची संख्या देखील दुप्पट झाली आहे.तर त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नसल्याने रेतीची तस्करी सुरळीत आहे.

त्यामुळे ते छातीठोकपणे सबकुछ मॅनेज असल्याचे सांगत आहे.यामुळे आता पुणे जिल्ह्याचे कार्यक्षम जिल्हाधिकारी राजेश देशमुख व जिल्हा खनिकर्म अधिकारी याकडे लक्ष देऊन वाळू तस्करी करणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारी अधिनियमांतर्गत कारवाई साठी प्रस्ताव तयार करणार का ? जेणेकरून वाळू तस्करीला आळा बसू शकतो. त्यामुळे आंबी खुर्द मध्ये वाळूची तस्करी करणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारी अधिनियमांतर्गत कारवाई होणार का ? हे पाहणं देखील औतूसक्याच ठरणार आहे.मध्यरात्र ते पहाटे सकाळी ही वाळू वाहून नेली जाते,असे परिसरातील ग्रामस्थांकडून सांगितले जाते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *