Cyber Education : सायबर जागरूकता काळाची गरज ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’पथनाट्यादरम्यान पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांचे प्रतिपादन..!!


विद्या प्रतिष्ठान आर्टस् अँड कॉमर्स महाविद्यालय आणि क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ पथनाट्याचे आयोजन….

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

सायबर गुन्हे आणि सायबर सुरक्षा याबाबत युवावर्गामध्ये जागरुकता असणे गरजेचे आहे. अनेकदा विद्यार्थी मोबाईल,संगणक आणि इंटरनेटचा वापर अधिक प्रमाणात करत असल्याने काहीतरी चूक भूल होण्याची शक्यता असते.आणि त्याच साठी योग्य वयात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते.आणि याच पार्श्वभूमीवर विद्या प्रतिष्ठान आर्टस्,सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालय,बारामती आणि क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉलेज मधील युवकांमध्ये सायबर जागृती व्हावी यासाठी सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ हा जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला होता..

ऑक्टोबर महिना हा सायबर जागृती महिना म्हणून साजरा केला जातो.त्या अनुषंगाने १५ ऑक्टोबर २०२३ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी भोईटे म्हणाले की,पोलीस विभागसुद्धा वेळोवेळी सायबर जागृती करीत असतो तरीसुद्धा नागरिक याला बळी पडताना दिसतात.फसवणूक झाल्यानंतर शासनाने १९३० टोल फ्री नंबर प्रसिद्ध केला आहे.त्याचा वापर करावा..आर्थिक फसवणूक झाल्यानंतर आपल्या खात्यातून लगेच पैसे काढले जातात.अशावेळी तात्काळ तक्रार केल्यास पैसे परत मिळण्यास मदत होते,मात्र तास-दोन तासाने आल्यानंतर हाती काहीच मिळत नाही असेही ते म्हणाले.

फसवणूक करणाऱ्याचे खूप मोठे रॅकेट असते ते पकडणे अवघड असते,पैसे मिळण्याचे प्रमाण पाच ते दहा टक्केच आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी १९३० या क्रमांकाचा वापर करावा.अशा प्रकारात शेतकरी फसत नाही तर शिक्षण घेतलेले सुशिक्षितच फसतात त्यामुळे शहरी भागातील नागरिकांनी जास्तीची जागरूकता बाळगली पाहिजे. यावेळी सादर केलेल्या पथनाट्याचे त्यांनी कौतुक केले.सकाळी विद्या कॉर्नर, सीटी इन चौक व सायंकाळी पाच वाजता रिलायन्स मॉल परिसरात पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.

यावेळी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.यामध्ये बी. बी. ए. (सी.ए.) व बी.एस.सी. (कम्प्युटर सायन्स) या विभागातील साहिल तावरे, अब्दुल्ला तांबोळी,शिवानी छेडे, सागर मेरावी,सूर्यवंशी शिवराज, युवराज जगताप, अनुजा भोंगळे,अनिकेत फडतरे,स्वराज मालुसरे,सुजल जठर,ओंकार पवार,श्वेता खैरे,धनश्री नहाने,श्वेता शिंदे, सबनाज मुलानी,कसीरा झारी ओमकार पवार,प्रणाली देवकर प्रणाली,आदित्य खरात,विठ्ठल  पाटील या २० सायबर योद्धा यांनी ‘सायबर सुरक्षेचे जागर’ हे पथनाट्य सादर केले.सध्याच्या मॉर्फिंग एडिटिंगमुळे आजचे युवक कसे फसवले जातात तसेच विविध प्रकारच्या सायबर हल्यांची माहिती व त्यावर काय काळजी घेतली पाहिजे हे या पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी सादर केले.

या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ.श्यामराव घाडगे,उपप्राचार्य डॉ.लालासाहेब काशीद,गजानन जोशी,किशोर ढाणे,महेश पवार यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचेही मोलाचे सहकार्य लाभले. उपक्रमासाठी शिक्षक समन्वयक सलमा शेख तर विद्यार्थी प्रतिनिधी साहिल तावरे यांनी विशाल शिंदे,अनिल काळोखे पुनम गुंजवटे, अक्षय भोसले,वैशाली पेंढारकर,अक्षय शिंदे,कांचन खिरे यांच्या मदतीने विशेष परिश्रम घेतले…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *