Rohit Pawar Speaks : भाजप-शिंदे गटाकडून ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी सावरकरांचा मुद्दा; आमदार रोहित पवारांनी घेतला भाजपचा खरपूस समाचार..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

राज्यात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी राज्यपालांनी अवमानजनक वक्तव्य केले होते, हर हर महादेव चित्रपटात शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास दाखवला गेला, कर्नाटकात छत्रपतींच्या पुतळ्याचा अवमान झाला, तेव्हा गप्प असणारी मंडळी सध्या सावरकरांच्या विषयावरून रणकंदन माजवत आहेत. काॅंग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात दरी पाडून ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी या मुद्द्याचा वापर होत असल्याचे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.

महाविकास आघाडीत या विषयावरून फूट पडेल असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलेले असले तरी त्यांची ही प्रतिक्रिया तत्कालीन आहे. त्यातून महाविकास आघाडीला तडा जाईल,असे अजिबात नाही. महाविकास आघाडी मध्ये फूट पडावी असे भाजप- शिंदे गटाला वाटत असल्याने त्यांनी या प्रकरणात जादा ताकद लावली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले दाम्पत्यांच्या बाबतीत त्यांना राजकीय फायदा दिसला नव्हता.सावरकर प्रकरणात तो दिसत आहे.शिवाय मविआमध्ये काही बिनसले तर आगामी निवडणुका सोप्या जावू शकतात, असे त्यांना वाटत असल्याने या विषयाला फूस दिली जात असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले.

सावरकर यांच्याविषयी माझा फारसा अभ्यास नाही. परंतु या प्रकरणी सर्वपक्षीयांसह विचारवंतांनी एका व्यासपीठावर येत चर्चा घडवून आणावी. खरा इतिहास जनतेसमोर आणावा. सावरकरांच्या विषयात राजकारण बाजूला ठेवून राहुल गांधी यांनी दाखवलेले पत्र, सावरकर यांचे लिखान समजून घेतले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधींचा कोणता दाखला या विषयी दिला, हे मला माहित नाही.परंतु अशा विषयात राजकारण करण्यात कोणाचेच हित नसल्याचे ते म्हणाले.राज्यात छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी राज्यपालांनी अवमानजनक वक्तव्य केले होते.हर हर महादेव चित्रपटात शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास दाखवला गेला,कर्नाटकात छत्रपतींच्या पुतळ्याचा अवमान झाला, तेव्हा गप्प असणारी मंडळी सध्या सावरकरांच्या विषयावरून रणकंदन माजवत आहेत.काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात दरी पाडून ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी या मुद्द्याचा वापर होत असल्याचे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *