Gopichand Padalkar Speaks : बारामतीचा तानाशहा माणूस,माणसं मारत नाही मात्र जिवंत माणसाचं रक्त शोषून घेतो ; आमदार गोपीचंद पडळकर यांची शरद पवारांवर जहरी टीका..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

युगांडा देशामध्ये एक तानाशहा नावाचा माणूस होता तो माणसाचा कत्तल करायचा आणि त्यांचं मांस खायचा त्याकाळी तिथल्या न्यायाधीशाने त्याच्या विरोधात निकाल दिला होता त्यावेळी त्याने त्या न्यायाधीशाला ठार मारून त्याच्या शरीराचे पार्ट काढून खायचा आणि इथला बारामतीचा तानाशहा माणूस माणसं मारत नाही मात्र जिवंत माणसाचं रक्त शोषून घेतो ही व्यवस्था गेली ४० वर्षापासून सुरू असल्याची जहरी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केली आहे..ते बारामतीत सेवा शक्ती संघर्ष कर्मचारी महाराष्ट्र राज्य बारामती शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

शिवसेना पक्ष राष्ट्रवादीने संपवला आहे काय यावर गोपीचंद पडळकर म्हणाले, आटपाट नगरीमध्ये एक राजा होता त्याचा हात लागला तर कुठल्याही वस्तूचं सोनं होतं असं सगळ्यांनी ऐकलं होतं पण बारामतीचे यथाकथीत जाणता राजाचा हात लागला तर त्याची राख होते हे आम्ही प्रत्यक्षात बघितलं.. कारण शरद पवार बरोबर गेलेल्या शिवसेनेचे काय झालं राष्ट्रवादीच्या बरोबर जाणाऱ्या सगळ्यांची राख होते हे समोर आलं आहे.

शिवसेनेला संपवायचं होतं ते आता त्यांनी प्रत्यक्षात केलं आहे.खरं तर निवडणूक आयोगाकडे आम्ही मागणी करायला पाहिजे होती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी विलानीकरण करून शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित करून ह्यांना खंजीर चिन्ह दिले पाहिजे होतं म्हणजे जेणेकरून लोकांपर्यंत हे चिन्ह लवकर पोहोचवल जाईल.मशाल चिन्ह रुजवायला वेळ लागेल खंजीर चिन्ह लोकांच्या लक्षात राहिलं असतं.राष्ट्रवादीचा जन्मच खंजीरातून झालेला आहे आणि आता नवा खंजीर खुपसायला निर्माण पवारांनी केला आहे.अशी घणाघाती टीका देखील शरद पवारांवर आमदार गोपीनाथ पडळकर यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *