पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
सध्या राज्यात विविध कारणावरुन राजकारण चांगलंच तापलंय.एकमेकांविरुध्द आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर कायमच टोकाची टीका केली जाते.आताही पडळकरांनी पवार यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.”बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय.पन्नास वर्षाचा त्याचा खेळ राज्यातील पोरांनी ओळखलाय” अशा शब्दात त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय.
पुण्यातील कामशेतमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवात बोलताना आमदार पडळकर यांनी पवारांवर टीका केलीय.भाजप आणि आरपीआयने संयुक्तरित्या या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
त्यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय.पन्नास वर्षाचा त्याचा खेळ राज्यातील पोरांनी ओळखलाय, असं म्हटलंय. आमदार पडळकरांनी शरद पवारांचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख मात्र त्यांच्याकडेच होता.
आरपीआयसह राज्यातील विविध संघटना आणि चळवळी कोणी फोडल्या ? असा प्रश्न पडळकर यांनी यावेळी उपस्थित केला. याबरोबरच संघटना आणि चळवळी फोडण्याचं हे काम पन्नास वर्षांपासून बहुजनांचा बुरखा पांघरून महाराष्ट्रात घुसलेल्या लांडग्याचं असल्याचं पडळकर यावेळी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.