Big Breaking : राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दणका..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात महाराष्ट्रात विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेली सर्व प्रकरणं सीबीआयकडे वर्ग करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.राज्य सरकारसाठी हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.एका आठवड्यात सर्व प्रकरणांची माहिती सीबीआयकडे वर्ग करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.यासोबतच परमबीर सिंह यांचे निलंबन कायम राहणार असल्याचंही सुप्रीम कोर्टने म्हटलं आहे. तसेच या प्रकरणात नवी एफआयआर दाखल झाल्यास त्याचा तपासही सीबीआयच करणार असल्याचंही कोर्टाने म्हटलं आहे.

परमबीर सिंह यांनी लेटर बॉम्ब टाकत १०० कोटींच्या वसुलीचा खळबळजनक आरोप केला होता.२० मार्च २०२१ या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून परमबीर सिंग यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात १०० कोटी वसूली आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.या आरोपाने राज्यात एकच खळबळ उडाली होती. परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटरबॉम्ब नंतर परमबीर सिंह यांच्यावर आरोप करत महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या होत्या.

या पाचही एफआयआरचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश आता सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यापूर्वी मुंबई हायकोर्टात परमबीर सिंह यांनी याचिका केली होती की, सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयने करावा.मात्र,मुंबई हायकोर्टाने ही याचिका फेटाळली होती.पण आता सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंह यांच्या सीबीआय चौकशीची मागणी मान्य केली आहे.आणि तशा प्रकारचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *