Breaking News : बंडा तात्या कराडकरांची जीभ पुन्हा घसरली ; केले पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बंडातात्या कराडकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्याविषयी वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं.त्यानंतर आता महात्मा गांधींबद्दल बोलताना त्यांची जीभ घसरली आहे.महात्मा गाधींचा उल्लेख म्हातारा करत ते म्हणाले,भगतसिंगांच्या मनावर इतका परिणाम झाला होता, की आता या म्हाताऱ्याच्या मार्गाने जायचं काहीही कारण नाही.”

क्रांतीकारक भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिनी ते पुण्यातील खेड राजगुरूनगर येथे बोलत होते. ”भगतसिंगांच्या मनावर इतका परिणाम झाला होता की, या म्हाताऱ्याच्या मार्गाने जायचं काही कारण नाही, असा विचार त्यांनी केला. त्यानंतर ते क्रांतिकारक बनले. या म्हाताऱ्याच्या पद्धतीने स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर एक हजार वर्ष लागतील”,असं लोकमान्य टिळकांचं वक्तव्य असल्याचा दावा देखील बंडातात्या कराडकरांनी केला.”शेवटी आपल्याला माहिती आहेच की, १९४७ साली आपल्याला अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळालं नाही.

१९४२ साली सुरू झालेल्या क्रांतिकारक चळवळीमुळे इंग्रजांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला”, असं बंडातात्या म्हणाले.”साबरमती के संत तुने कर दिया कमाल, दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल असं म्हणणं म्हणजे साडेतीनशे लोकांच्या संपूर्ण क्रांतीचा अपमान केल्यासारखं आहे. महात्मा गांधींचा अहिंसावाद आणि हिंदुत्व हे दोन्ही ही पक्षपातीच आहेत. पण त्या विषयात आत्ता आपण घुसायचं काही कारण नाही”, असं बंडातात्या म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *