Indapur News : वालचंदनगर क्रिकेट स्पर्धेचा राजवर्धन पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न..!!


इंदापूरच्या हाजी मस्तान संघाने पटविला चषक..

इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

राजवर्धन दादा पाटील मित्र परिवार वालचंदनगर यांच्या वतीने वालचंदनगर येथे भरविण्यात आलेल्या भव्य क्रिकेटचे स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा प्रारंभ इंदापूर तालुक्याचे युवा नेते व नीरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते नाणेफेक करून रविवारी करण्यात आला.द एम्पायर फाउंडेशनचे आकाश वस्ताद भोसले व विजय चितारे यांनी सदरच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. इंदापूरच्या हाजी मस्तान संघाने सामना जिंकून अंतिम पारितोषिक पटकावले.

गेली ४ दिवस चालू असणाऱ्या या स्पर्धेची अंतिम लढत हाजी मस्तान इंदापूर व नातेपुते येथील संघात झाली. अंतिम सामन्याचा राजवर्धन पाटील यांनी मनसोक्त आनंद घेतला व युवा वर्गाला प्रोत्साहित केले.अंतिम सामन्याला नीरा-भीमा कारखान्याचे चेअरमन लालासो पवार,शरदनाना चितारे अध्यक्ष भीमशक्ती सामाजिक संघटना,इंदापूर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन सत्यशील पाटील,सरपंच कुमार गायकवाड,इंदापूर सोशल मीडियाचे उपाध्यक्ष विक्रमसिंह मोरे,पुणे जिल्हा सरचिटणीस गजानन वाकसे,लासुर्णे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य नेताजी लोंढे, ग्रामपंचायत सदस्य संजय नकाते व मान्यवर उपस्थित होते.

युवा नेते राजवर्धन पाटील हे अंतिम सामन्यास उपस्थित असल्यामुळे युवक वर्गात जल्लोष पाहायला मिळाला. तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक वालचंदनगर संघाने तर चौथे पारितोषिक मगराचे निमगाव संघाने पटकावले.या मॅचेसचे यशस्वी आयोजन करण्यासाठी अनिल कांबळे, सुनील कांबळे,पका चव्हाण,तुषार भोसले,अभि भांगे, अविनाश चंदनशिवे,सोनू रणपिसे,सागर भोसले,दादा कांबळे,श्रीनिवास पाटील, आशिक भोसले,छोटू चीतरे, निखिल ढोबळे,संकेत कांबळे, इन्नुस पठाण,विपुल लोंढे, गोटू मोरे व युवक वर्गाने परिश्रम घेतले.मॅचेसचे अंपायर करणेसाठी उरळी कांचन येथील प्रसिद्ध काकडे सर यांनी काम पाहिले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *