बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले,याप्रसंगी राष्ट्रवादीचे सर्वसर्वा ज्येष्ठ नेते हे बोलत होते.यावेळी मात्र शरद पवारांनी आपल्या पुतण्याचे म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कामांचे भरभरून कौतुक देखील केले.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे दर्जेदार विकास कामाचे सूत्र होय हे सबंध महाराष्ट्राला माहीत झाले आहे.बारामतीत अजित पवारांनी विकास कामे करत असताना बारामतीत मेडिकल कॉलेज,नगरपरिषद इमारत,प्रशासकीय भवन, आरटीओ कार्यालय,ऊर्जा भवन इमारत बांधत शहराच्या वैभवात भर घालणारी विकास कामे केली आहेत.
या विकास कामांचे कौतुक करत असताना मला त्रास होत असल्याचे खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.ते बारामती पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.शासकीय इमारती जनतेने दिलेल्या कराच्या पैश्यातून उभ्या रहातात,त्याला जनतेच्या घामाचा सुगंध असतो.त्यामुळे इमारतीत काम करणाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे आणि इथे येणाऱ्या व्यक्तीच्या करातून आपल्याला पगार मिळतो याची जाणीव ठेवावी.लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता काम करण्याची आवश्यकता आहे.विकासाची कामे करताना गोरगरीबांनाही त्याचा उपयोग होईल याची दक्षता घेण्यात येईल.
पंचायत समितीच्या इमारतीत बँकेसह इतरही सुविधा देण्यात येणार आहेत.जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीतून दूरदृष्य प्रणालीची सुविधा देण्यात येणार आहे,त्यामुळे कामकाज गतिमान होण्यास मदत होईल. ही इमारत राज्य आणि देशातील पंचायत समितीची भव्य इमारत असावी.इमारतीच्या माध्यमातून चांगले काम उभे रहावे.पंचायत समितीच्या कामकाजाचे वेगळे महत्व आहे.लोकप्रतिनिधींनी पंचायत समितीच्या माध्यमातून चांगले कार्य करून आपली वेगळी ओळख निर्माण केली.नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वात कार्यामुळे राज्यात पंचायत राज व्यवस्था महाराष्ट्रात रुजली.याच माध्यमातून सत्ता सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम झाले.
सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याची ही परंपरा यशस्वी झाली. लोकशाही व्यवस्थेचे बळकटीकरण होऊन लोकशाही मजबूत झाली.बारामती शहरात अनेक कार्यालये आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुंदर इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत.कवी मोरोपंतांच्या स्मारकचे काम अंतिम टप्प्यात आहे.पोलीस अधीक्षक कार्यालय, बाजार समितीची सर्व सुविधायुक्त वास्तू,अद्ययावत क्रीडा संकुल, पाणी पुरवठा योजना आदी सुविधा जनतेसाठी निर्माण करण्यात येत आहे.बारामती बसस्थानकाचे काम पूर्ण होत आहे.हे बसस्थानाक राज्यातील प्रमुख स्थानकात गणले जाईल.बारामती हे शिक्षणाचे ‘हब’ म्हणून ओळखले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाणी पुरवठ्याच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून ग्रामीण भागाचा पाण्याचा प्रश्न कायमचा दूर करण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितले.
तसेच ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून महिला समृद्धीसाठी बचत गटांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यांनी तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहेत.स्व.आर. आर.पाटील यांच्या स्मृती दिनी सुंदर गाव स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.पंधराव्या वित्त आयोगातील निधी ग्रामपंचायतीसोबत काही प्रमाणात जि.परिषद आणि पंचायत समित्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्याने यशस्वीपणे राबविलेली पाणंद रस्ते आणि गोठे बांधण्याची योजना राज्यभरात राबविण्यात येत आहे. नगरोत्थान योजनेप्रमाणे मोठ्या गावांचा विकास करण्याची योजना आणण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,जि.प.अध्यक्ष निर्मला पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, न.प.अध्यक्षा पौर्णिमा तावरे,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे,पंचायत समिती सभापती नीता फरांदे,जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रमोद काकडे,पंचायत समितीचे उपसभापती रोहित कोकरे,एकात्मिक पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे,तहसीलदार विजय पाटील,गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल, पंचायत समितीचे सदस्य, नागरिक आदी उपस्थित होते