मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ हा महाराष्ट्रासह संपुर्ण देशात लागु करण्यात आला आहे. या कायदयाचा प्रमुख उददेश जनतेस सुरक्षित,सकस व निर्भेळ अन्न् उपल्ब्ध करुन देणे हा असून, अनेकदा लोकांमार्फत बाहेरुन नाष्टा मागविला जातो. त्यावेळी अन्न् व्यवसायिक हे वडापाव,पोहे या सारखे अन्न् पदार्थ न्यूज पेपर मध्ये बांधुन देतात,त्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होतो.तसेच वृत्त्पत्राची शाई ही केमिकल पासुन बनविलेली असते.( डाय आयसोब्युटाइल फटालेट आणि डायइन आयसोव्युटाइल) या केमिकलचा वापर वृत्त पत्र छपाईसाठी करतात.
अशा न्युजपेपरमध्ये गरम खादयपदार्थ पॅकींग करणे व ग्राहकांना देणे धोकादायक ठरत आहे.त्यामुळे भारतीय खादय सुरक्षा मानके प्राधिकरण (FSSAI) भारत सरकार यांनी हे आदेश निर्गमित्त करण्यात आले आहेत.तरी सर्व अन्न व्यवसायिक छोटे मोठे हॉटेल्स,बेकरी व्यवसायिक,स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट,वडापाव,भजी व भेळ विक्रेते यांना ईशारा दिला असून,न्यूज पेपरमध्ये अन्न पदार्थाचे पॅकींग त्वरीत बंद करावे
अन्यथा अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ नियम व नियमन २०११ अंतर्गत योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल अशा ईशारा अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे.