मोठी बातमी : गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला त्यांना तात्काळ विशेष सुरक्षा द्यावी,देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंकडे पत्राद्वारे मागणी..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार गोपीचंद पडळकर हे मुंबईत आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत.गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सांगली आणि सोलापूरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांना विशेष पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.फडणवीस यांनी या संदर्भातील पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पडळकर यांच्या सुरक्षेबद्दल पत्र लिहिलं

गोपीचंद पडळकर हे राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणां विरोधात आक्रमक होत आंदोलन करीत आहेत,यामध्ये त्यांच्या जीवाला धोका असल्याचा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी
पत्रात केला आहे.बहुजनांच्या बाजूनं उभ राहिल्यामुळे काही
लोक त्यांच्यावर सातत्यानं हल्ला करत आहेत.लोकशाहीत विरोधकांचा आवाज हिंसेनं दाबणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.विरोधक असो वा सत्ताधारी ज्याचा जिवास धोका त्याला संरक्षण दिल पाहिजे आणि म्हणूनच विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना तात्काळ विशेष सुरक्षा दयावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.गोपीचंद पडळकर यांच्या जिवास काही बर वाईट झाल्यास ही राज्य सरकारची जबाबदारी असेल,असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *