मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज….
कोरोना काळामध्ये राज्यात बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे.राज्यातील बालविवाह रोखण्यासाठी राज्य महिला आयोग सक्रिय झाले आहे.बालविवाह रोखण्यासाठी महिला आयोगाने एक नवीन नियम लागू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.या पत्रात रुपाली चाकणकर यांनी बालविवाह झाल्यास सरपंच,ग्रामसेवक,
तलाठ्यांचे पद रद्द करावे अशी मागणी केली आहे.बाल विवाहाची सद्यस्थिती पाहता सदरचे या नवीन नियमानुसार महाराष्ट्रातील बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे आवश्यक आहे.
त्यामुळे महाराष्ट्रात ज्या ठिकाणी बालविवाह झाल्याचं निदर्शनास आल्यास तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी जसं की सरपंच तत्सम प्रतिनिधी आणि विवाह नोंदणी अधिकारी जसं की, ग्रामसेवक,तलाठी किंवा तत्सम अधिकारी यांची जबाबदारी निश्चित कारावी.त्यानंतर अशा प्रकारची घटना घडली व त्याची दोष सिद्धी झाल्यास त्यांचे पद रद्द करण्यात यावं.ही दुरुस्ती बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ मध्ये करावी.बालविवाह झाल्याचे सिद्ध झाल्यास त्यांचं पद रद्द करण्यात यावे अशी शिफारस राज्य महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून करत असल्याचे पत्र रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.