राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाभरती,२१ नगरसेवकांसह ११४ जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश…!!


उल्हासनगर मध्ये भाजपला खिंडार.

उल्हासनगर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

राष्ट्रवादी काँग्रेसने आज उल्हासनगरमध्ये भाजपला चांगलाच हादरा दिला आहे. भाजपच्या ३२ पैकी २१ नगरसेवकांनी तसेच वरप, म्हारळ, कांबा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच, सदस्यांसह ११४ जणांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामाजिक न्यायमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यावेळी ठाणे शहराध्यक्ष तथा ठाणे – पालघर जिल्हा समन्वयक मा.खा.आनंद परांजपे यांनी या सर्वांना पक्षात प्रवेश दिला.यावेळी सौ.पंचम कलानी यांना उल्हासनगरच्या जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देखील दिले. विशेष म्हणजे टीम ओमी कलानीदेखील राष्ट्रवादीमध्ये विलीन झाली.

उल्हासनगरमध्ये गेल्या पाच वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणार्यांची संख्या वाढली होती. परिणामी, विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपचे कुमार आयलानी हे विजयी झाले होते. मात्र,आता भाजपच्या या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुंग लावला आहे. टीम ओमी कलानीसह भाजपचे सुमारे २१ नगरसेवक,१९ माजी नगरसेवक, वरप,कांबाचे सरपंच, म्हारळचे उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य अशा सुमारे ११४ जणांनी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ताकद लक्षणीय रित्या वाढली आहे.भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये पंचम ओमी कलानी,डिंपल ठाकूर नगरसेविका,शुभांगी निकम,दिपा छाया चक्रवर्ती,हरेश जग्यासी, कविता गायकवाड,दिप्ती दुधानी दिनेश लहिरानी,रेखा ठाकूर, सरोज टेकचंदानी,आशा भिराडे,सविता तोरणे-रगडे,रविंद्र बागुल,मनोज लासी,चंद्रावती देवीसिंग, ज्योती चैनानी,गजानन शेळके यांचा समावेश आहे. तर, कांबा व म्हारळ ग्रामपंचायतीचे भारती भगत सरपंच – कांबा गाव, संदिप पावशे उपसरपंच – कांबा गाव, निलेश देशमुख उपसरपंच – म्हारळ गाव, हरिदास पवार सदस्य – कांबा गाव, संतोष पावशे सदस्य – कांबा गाव, ईशा भोईर सदस्य – कांबा गाव, सोनाली उबाळे, छाया बनकर यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

तर, आरपीआय नगरसेवक मंगल वाघे आणि पीआरपी नगरसेवक प्रमोद टाळे यांनीही राष्ट्रवादीला सहयोगी राहणार असल्याचे यावेळी जाहीर केले.यावेळी उपस्थित लोकांना संबोधित करताना आव्हाड म्हणाले की, “कलानी कुटुंबीयांसह अनेक नगरसेवकांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेवरून या सर्वांना पक्षात प्रवेश दिला आहे.या सर्वांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची उल्हासनगर पंचक्रोशीमध्ये ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असून आगामी पालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता काबीज करण्याची शक्यता निर्माण झाली आहे…!”


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *