दहिगाव येथे कृषी विद्यार्थ्याकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन….!!


दहिगाव : विकास बेलदार

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी वद्यापीठां अंतर्गत यशोदिप सामाजिक विकास संस्था संचलित उद्यान – विद्या महाविद्यालय सराळगाव (ठाणे) येथील उद्यानविद्या पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी विराज अशोक रुपनवर,विशाल विजय कदम यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी आधारित उद्योग संलग्नता कार्यक्रम सन २०२१-२२ च्याअभ्यासक्रमांतर्गत दाहिगव येथील शेतकऱ्यांना आधुनिक,सेंद्रिय व शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले.कोरोना परिस्थितीमुळे विद्यार्थी स्वत:च्या गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.

यावेळी शेतकऱ्यांचा शेतीविषयक अनुभव जाणून घेऊन त्यांना व ग्रामस्थांना कोरोना महामारीचा प्रादुर्भाव असल्यामुळे सुरक्षिततेचे उपाय, कोविड लसीकरण जनजागृती, माती परीक्षणाचे महत्व, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन,फळबाग व्यवस्थापन,फुलबाग लागवडीस असणारा वाव, हरितगृह विषयी माहिती, बिजप्रक्रिया , औषधे फवारणी करताना घ्यावयाची काळजी, शितकक्ष निर्मिती,आणि नाबार्ड योजना तसेच विविध विषयांवर चर्चासत्रे आणि प्रात्यक्षिके घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.याप्रसंगी दहीगव गावाचे ग्रामस्थ उपस्थित होते.या उपक्रमासाठी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.सरोदे सर सर,कार्यक्रम समन्वयक प्रा. एस.पि.घुले मॅडम,प्रा. प्रफुल्ल ढावरे सर इतर तज्ञांचे मार्गदर्शन लाभत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *